Team Agrowon
शिपमेंटला वेळीच अटकाव न केल्यास देशात पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो, असाही दावा ‘सोपा’कडून करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्लांट प्रोटेक्शन आणि क्वारंटाइन खात्याचा प्रभार असलेले संयुक्त सचिव प्रमोद कुमार यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई बंदरावर हे सोयाबीन दाखल झाले आहे. देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनला बंदी आहे.
हे सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास बियाणे म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. यातूनच कृषी आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
आफ्रिकन देशांमधून अशाप्रकारचे सोयाबीन आयात केले जाते. त्याकरिता शून्य आयात शुल्क आहे.
आफ्रिकन देशांमध्ये सोयाबीनचे नाममात्र उत्पादन होते. त्यामुळे आफ्रिकेतून सोयाबीनची आयात झाली असती, तर ती १००-२०० टना पेक्षा अधिक नसती.