महारुद्र मंगनाळे
चार वर्षांपूर्वी विहिरीच्या बाजुला हा आणि याच बंधाऱ्यावर इतर तीन आंब्यांची रोप लावली होती.यातील दोन वर्षभरातच वाळली.एक आंबा मोठा होऊन अडिच वर्षांनंतर अचानक वाळला.
विहिरीवरील हा एकमेव आंबा टिकला. छान वाढला.गतवर्षी तीन-चार आंबे लागले होते.शेवटपर्यंत एकही टिकला नाही.त्यामुळं चवही कळली नाही.
यावर्षी या आंब्याला मोहोर लागल्याचं मला दिसलं नाही.विहिरीलगतच हा आंबा असल्याने, इथं दिवसभरात चार-पाच चकरा होतात.सकाळी मी मोटार बंद करण्यासाठी विहीरीवर आलो.
तेवढ्यात तिथं नरेशही आला. या आंब्याच्या वाढीला अडथळा ठरत असलेली चार सीताफळाची झाडं,एक छोट कडुलिंबाचं झाड आणि काही फांद्या काढ,असं मी सांगत होतो..आणि अचानक नरेशचं आणि माझं या आंब्यांवर लक्ष गेलं..
मामा,बघा तीन आंबे आहेत याला.बघून मीही चकीत झालो..मी म्हटलं, इतक्या दिवसात आपल्याला कसे काय दिसले नाहीत हे आंबे?
त्याचे फोटो काढून सध्या रुद्रा हटवर असलेल्या एखाद्या आंब्याशी हा जुळतो का बघितलं.बहुतेक वेगळा दिसतोय... कदाचित चार वर्षांपूर्वी वाळलेल्या मारूतीच्या आंब्याचं तर हे रोप नसेल? ... नक्की नाही सांगता येणार.