Team Agrowon
शनिवारी नगर जिल्ह्यातील नांदूर खुर्द व खंडाळा ता. रहाता येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेसह कांदा, मका पिकाची पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी साधला.
यावेळी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, कृषि सह संचालक रफिक नाईकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्यासह कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
अलीकडेच नाशिक जिल्ह्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र घाईघाईने पाहणी दौरा करत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
"आमच्या भागांची पाहणी अवघ्या काही मिनिटात उरकली. तसेच आमच्या मागण्याही कृषिमंत्र्यांनी ऐकल्या नाहीत,"अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.
तसेच रात्रीच्या अंधारात पाहणी करून काय करणार आहेत? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.