Team Agrowon
महाराष्ट्र शासन आणि जपान देशातील वाकायामा शासन यांच्यात सामंजस्य करारांचे नुतनीकरण करण्यात आले.
भारत आणि जपान यांच्यातील परस्पर संबंध असेच दृढ रहावे अशी भूमिका यासमयी मांडली. यावेळी कुस्ती आणि सुमो खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
भारत आणि जपान देशांमध्ये पूर्वापार चांगले संबंध आहेत. हे संबंध अधिकाधिक दृढ होण्यासाठी महाराष्ट्र आणि वाकायामासारख्या प्रांताचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
ऑक्टोबर २०१३ मध्येच उभयंतामध्ये पर्यटन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबधित करार झाला होता.
या कराराची ही दशकपूर्ती झाल्यानंतर कराराचे नूतनीकरण करण्यात आले. कुस्ती हा खेळ जसा आपल्याकडे लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे सुमो हा खेळ जपानमध्ये लोकप्रिय आहे.
आज या निमित्ताने या खेळांची प्रात्यक्षिके थेट गेट वे ऑफ इंडिया येथे सादर करण्यात आली. त्याचा सगळ्यांनाच फार आनंद झाल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.