Team Agrowon
डेअरी उद्योगाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुबंईच्या बाजारपेठेवर अमूलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
महानंद कुचकामी ठरल्याने परराज्यातील डेअरींनी स्थानिक बाजारपेठ ताब्यात घेतल्याचे डेअरी उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.
आर्थिक राजधानी शिवाय डेअरी उद्योगाचे प्रमुख केंद्र अशी मुंबईची ओळख समजली जाते.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून रोज दीड कोटी लिटरपेक्षा जास्त दूधाचे उत्पादन केले जाते.
यापैकी मुंबईच्या बाजारपेठेकडून अंदाजे ५५ लाख लिटर दुधाची खरेदी केली जाते.
महानंदच्या व्यवस्थापनातील सततच्या गैरव्यवहार आणि राजकारणामुळे आता अवघी ८० हजार लिटरची बाजारपेठ महानंदकडे उरली आहे.
या उलट अमूलकडे ३० टक्क्यांच्या आसपास हिस्सा असून सध्या अमूलकडून मुंबईच्या बाजारात दररोज १६ लाख लिटर दूध विकले जाते आहे.