Team Agrowon
मुक्त संचार गोठ्यात वैरण, पाणी व स्वच्छ हवा २४ तास पुरवली जाते.
जनावरांना फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुरांचे आजार होत नाहीत.
जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.
पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो.
नैसर्गिक सर्व सुविधा मिळाल्यामुळे गायी, म्हशी आनंदी वातावरणात राहतात. त्यामुळे म्हशींमधील पान्हा सोडण्याची समस्या सुद्धा कमी होते.