Team Agrowon
नांदेड जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
यासोबतच रब्बी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीज पडून नागरिक जखमी झाले, तर जनावरेही दगावले आहेत.
मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, पाटनूर, खांबाळा, जावरा मुरार, चोरंबा, नागेली, पाथरड, बोरगाव, नांद्री, मुगट, आमदुरा, शंखतीर्थ, चीत गिरी, शेंबोली, पांढरवाडी, वैजापूर, पार्डी, गोबरा तांडा, तिरकसवाडी आदी गावांसह परिसरात गारपिटीने नुकसान झाले.
पावसादरम्यान गारांचा मारा सुरू झाल्याने रब्यातील गहू, हरभरा पिकाचा चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.
या अस्मानी संकटात वेलवर्गीय पीक टरबूज, खरबूज, काकडीसह टमाटर स्ट्रॉबेरी आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे.
वादळाचा तडाखा चिकू, आंबा, संत्रा, मोसंबी या फळपिकांना बसला. झाडाखाली फळांचा सडा पडला होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.