Team Agrowon
जंत प्रादुर्भावामुळे जनावरांचे पचन बिघडते व जनावरांची वाढ खुंटते.
जनावरांना रक्तक्षय होतो. केस खडबडीत आणि रुक्ष होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
जंताचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावर वेळेत वयात येत नाही. जनावर माजावर आले तरी गाभण राहण्यास विलंब होतो.
वासराची योग्य वाढ न झाल्याने, त्याने खालेल्ला चारा न पचल्याने आणि त्याची वजनवाढ न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होते.
वर्षातून किमान तीन वेळा जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे.
जंतनिर्मुलन करण्यापूर्वी जनावरांची शेण तपासणी करून त्यात आढळणाऱ्या जंताच्या प्रकारानुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची निवड करावी
शेण तपासणी केल्यामुळे कोणत्या प्रजातींच्या जंताची, किती प्रमाणात लागण झाली आहे हे समजते. त्यानुसार जंतनाशक देण्याची गरज आहे का? हा निर्णय घेणे शक्य होते.