चांगली ओल असल्याशिवाय सोयाबीन पेरणी करू नका!

टीम ॲग्रोवन

‘‘चांगली ओल म्हणजे ७४ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) करावी,’’ असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

राज्यात मॉन्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे कृषी आयुक्तालयाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

सोयाबीन बियाणे वापरण्यापूर्वी उगवणक्षमतेची चाचणी घ्या. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असा सल्ला देण्यात आलेला आहे.

सोयाबीन बियाणे प्रतिहेक्टरी सध्या ७५ किलो वापरले जाते. ते ५० ते ५५ किलोपर्यंत आणता येईल. त्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅन्टरचा वापर करावा, असेही आयुक्तालयाचे म्हणणे आहे. पेरणी करताना ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत करावी, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

बीजप्रक्रियेसाठी प्रतिकिलो ३ ग्रॅम थायरम वापरा तसेच पेरणीपूर्वी प्रति १० ते १५ किलो बियाण्यास तीन तास अगोदर प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी व सावलीत वाळवावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.