Team Agrowon
फुलंब्रीच्या आठवडी बाजारात चक्क साडेसहा हजार रुपयांनी कापसाचे खरेदी व्यापारी करताना दिसून आले आहेत.
विशेष म्हणजे भाव वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता.
मात्र, भाव वाढ न होत दिवसेंदिवस भाव कमी होत असल्याने नाइलाजाने बळिराजाला कापूस विकावा लागत आहे.
सुरुवातीला कापसाने नऊ हजाराचा पल्ला पार केला होता.
आता मात्र, दररोज कापसाच्या दरात घसरण सुरू असल्याने केवळ साडेसहा हजारांवर कापसाचे दर आलेत.
शासनाने कापसाला स्थिर हमीभाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
फुलंब्री तालुक्यात यावर्षी सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे.
कापसाचे भाव स्थिर नसल्याने कापूस विकावा की घरात ठेवावा या चिंतेने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.