Team Agrowon
ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
यातून ग्रामीण तरूणांमध्ये उद्योजकतेचे वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण परीसराला मिळू शकतो.
ग्रामीण भागातील विविध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास शेतीमालाला उत्तम दर मिळण्यास मदत होईल.
एखादा देश प्रगत होण्यामागे त्याची उद्योगी वृत्ती आणि उद्योजक विचारसरणी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
कारण एखाद्या मोठ्या उद्योगानेही परिसरातील विविध छोट्या उद्योगांना चालना मिळते. रोजगाराची निर्मिती होते.
बाजारपेठेमध्ये पैसा खेळता राहतो. स्थानिक प्रशासनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर मिळाल्याने अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना मिळते.