Team Agrowon
शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली.
तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत हीच बाब अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात व्यक्त केली.
आज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच आमदार निलेश लंके यांनी कृषी प्रदर्शनाला धावती भेट दिली.
या ठिकाणी शेतीतील नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी तज्ञांकडून घेतली.
पवार म्हणाले, या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे.
२६२ दशलक्षटणावरून आज ३०० दशलक्षणाच्या पुढे गेलेले अन्नधान्याचा साठा हे हेच दर्शवते की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे.
या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले.