Team Agrowon
मागील दोन दिवसापासून पुणे जिल्हयात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या वातावरणाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
पुणे जिल्हयात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरूवात झाली होती. मात्र पावसाने हजेरी लावली आहे.
यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळींब पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, कांदा, फळबागा पिकांला फटका बसत आहे.
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली आहे.
पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
अद्यापही वातावरणात काही बदल होताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.