Team Agrowon
दिल्लीहून बुलढाणा जिल्ह्यात आगमन प्रसंगी मलकापूर येथे कार्यकर्त्यांनी व शेतकरीपूत्रांनी उत्स्फुर्तपणे जंगी स्वागत केले.
यावेळी शहीद जवान स्व.संजयसिंह राजपूत यांच्या स्मृतीस्थळी जावून अभिवादन केले.
सोयाबीन-कापूस उत्पादकांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी ही राजधानीची वारी केली होती.
त्यांच्यापर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या, मागण्या मांडल्या व लावून धरल्या.
केंद्र सरकारवर पोल्ट्री लॉबी व कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा दर पाडण्यासाठी प्रचंड दबाव आहे व या लॉबी दिल्लीत तळ ठोकून आहेत.
शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन्स कापणार नाही, असा निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडले.