Team Agrowon
नवी दिल्लीत पुसा येथे पहिली जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषद नुकतीच पार पडली.
जगापुढील अन्नसुरक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भरडधान्ये एक प्रभावी उपाय ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या परिषदेला उपस्थिती लावली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष घोषित केले आहे. याबाबतचा प्रस्ताव भारतानेच दिल्याचे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देत असल्याचे मोदी म्हणाले.
जागतिक चळवळीचा भाग म्हणून भारत सातत्याने भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हणून प्रोत्साहन देत आहे.
देशाच्या भरडधान्य मोहिमेचा अडीच कोटी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.