Roshani Gole
पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते.
आहारात अतिरिक्त प्रमाणात हिरव्या चाऱ्याचा समावेश केल्यास, जनावरांना पोटफुगीसारखे आजार होत असतात.
चाऱ्यातून जनावरांना नायट्रेट, हायड्रोसायनिक अॅसिड, ऑक्झलेट्स या घटकांची विषबाधा होण्याची शक्यता असते.
नायट्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास केल्यास त्यातून तयार होणारा वायू देखील जनावरांसाठी घातक ठरू शकतो.
शरीरात ऑक्झलेट्सचे प्रमाण वाढल्याने कॅल्शियमची पातळी कमी होते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास, इतर घटकांच्या शोषणास अडथळा येतो.
पावसाळ्यात चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास ही विषबाधा टाळता येऊ शकते. आपल्याकडील जनावरांची एकूण संख्या लक्षात घेऊन, त्यानुसार चाऱ्याचे नियोजन करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.