Team Agrowon
मे महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, कांद्यासह तेलबिया, कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स फारसे सक्रिय नसतात, पण यावेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे.
ढगांच्या हालचालीत झालेल्या बदलामुळे कोरड्या भागात अधिक पाऊस पडू लागला आहे.
या अवकाळी पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला असून काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्यासह तेलबिया, कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जनावारांचा चाराही भिजला आहे
उन्हाळ्यात झालेल्या पावसाचा परिणाम ग्रामीण आणि शहरी भागातही जाणवत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे
गेल्या वर्षी याच काळात उष्णतेची लाट आली होती. यावेळी उष्णतेची लाट नसली तरी तापमानात सामान्यपेक्षा 10 अंशांनी घट झाली आहे.
या पावसाचा फळे, फुले, भाजीपाला यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.