Team Agrowon
राज्यात चालू ऊस गळीत संपून तब्बल दोन महिने झाले, तरीही राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली नाही.
कारखान्यांनी शेतकऱ्यांची थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १२ हजार ४०० कोटी रुपये थकवले आहेत.
१५ मेपर्यंत ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या ९ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटीस काढली आहे.
राज्यात ऊस गळीत नुकताच संपला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ऊसाचे उच्चांकी गाळप झाले असून उताराही चांगला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले असतानाही अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एफआरपी दिली नाही.
राज्यातील २१० साखर कारखानदारांनी १५ मे पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचे ३२ हजार २३० कोटी दिले आहेत.
एकूण देय एफआरपीच्या ९६.२ टक्के आहे. अद्यापही कारखान्यांकडे एफआरपीचे १२ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.
एप्रिलपर्यंत राज्यातील एकूण २१० कारखान्यांयांपैकी केवळ १०५ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली.