Team Agrowon
पीक लागवडीपासून ते वाढीस असताना त्यांच्या विविध अवस्थांमध्ये पिकात वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे.
स्फुरद, पालाशयुक्त खते पिकास उपलब्ध होण्यास वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळेस द्यावी लागते
आवश्यकता असल्यास फुलोऱ्याची वेळ, दाणे भरण्याची अवस्था या काळात विद्राव्य खतांची फवारणी केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
काही भागात अतिवृष्टी झालेली आहे. अशा ठिकाणी उभ्या पिकात पाणी साचलेले आहे. पाणी साचलेल्या जमिनीत खते देऊ नयेत.
जमिनीतील अति ओलावा किंवा कमी ओलावा या दोन्ही परिस्थितीत खतांची कार्यक्षमता कमी होते व त्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते.
पाऊस झाल्यावर लगेच किंवा पावसाने मोठी उघडीप दिली असल्यास पिकास खते देणे टाळावे. पावसाचा पूर्व अंदाज घेऊनच खतांचा वापर करावा.
मुख्यत्वे नत्रयुक्त खतांची अर्धी मात्रा पीक लागवडीच्या वेळेस द्यावी. उरलेली अर्धी मात्रा पीक लागवडीपासून ३० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस विभागून द्यावी.