Team Agrowon
धान्य साठवणीपूर्वी त्यातील किडलेले, खराब दाणे चाळून आणि उधळणीद्वारे वेगळे करावेत.
मळणी केल्यानंतर धान्य उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यावं. धान्यातील ओलाव्याचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावं.
साठवणुकीच्या धान्यातील तांबडा भुंगेरा
.धान्याची पोती जमिनीवर रचून ठेवू नयेत.जमिनीवर साठविल्यामुळे धान्य जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेते. परिणामी, धान्य चांगले वाळविलेले असून देखील त्यातील ओलाव्याचे प्रमाण वाढते.
धान्य साठवणुकीसाठी शक्यतो लोखंडी किंवा धातूपासून बनविलेल्या पत्र्याच्या कोठ्या वापराव्यात.
साठवलेल्या धान्यातील पतंग.
साठवणीच्या गोण्या किंवा पोती गरम पाण्यात ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे भिजवून नंतर वाळवावीत.आणि नंतर त्यात धान्य भरावे.