Team Agrowon
फळांच फळमाशी पासून संरक्षण कराव. फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी दोन या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यावर लावावेत.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने तीन ते चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडाच्या बुंध्या भोवती गवताच अच्छादन कराव.
ओलावा टीकवून ठेवण्यासाठी आंबा कलमांना पाणी देण्यासाठी तयार केलेल्या अळ्यांमध्ये सेंद्रय पदार्थांच आच्छादन करावं.
सुपारी एवढ्या आकाराच्या फळांची गळ कमी करण्यासाठी पाण्याच योग्य व्यवस्थापन कराव. पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने तीन ते चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
फळांचा आकार व वजन वाढवून डागविरहित फळांच्या उत्पादनासाठी फळधारणेनंतर एक महिना ने साधारण फळ गोटी ते अंडाकृती असताना फळांवर २५ बाय २० सेंमी आकाराच्या कागदी पिशव्यांच आवरण घालाव.
फळधारणा झालेल्या अंबा बागेमध्ये फळगळ कमी करण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फळे वाटाण्याएवढी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या घ्याव्यात.