Team Agrowon
मोचा वादळ बंगालच्या उपसागरात सक्रीय झाल्याने देशभऱातील वातावरणात मोठे बदल होत आहे.
या चक्रीवादळाचा सध्यातरी पूर्व किनार पट्टीचा भाग वगळता प्रभाव नाही. त्यामुळे देशात इतर भागात तापमान वाढत आहे.
हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे
गेले तीन दिवस जळगाव, नागपूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारीही जळगाव येथे ४५.८ अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना दिवसभरात वारंवार पाणी प्यावे.
उन्हात घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर डोक्यावर टोपी घाला. उष्णतेच्या लाटेपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा.
पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.