Team Agrowon
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर कोसळल्याने संताप व्यक्त करत आहेत.
उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला.
६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डोंगरे यांनी कांदा पेटवून दिला.
कांद्याच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचले आहे.
डोंगरे यांनी शेतात सहकुटुंब एकत्र येत होळीचे औचित्य साधून दीड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी केली.
बाजारात कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
यावेळी डोंगरे यांच्या शेतात शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिलांचा सक्रिय सहभाग यावेळी पाहायला मिळाला.