Team Agrowon
ज्या पॉलीहाऊसवाल्यांचे नुकसान झाले त्यांना शेतीपिक नुकसान भरपाई किंवा कर्ज माफीत समावेश नसल्याने भरपाई मिळत नाही.
निर्यात बंद झाल्याने फुलांना पुरेसा भाव मिळत नाही. यातून पॉलिहाऊस व्यवसाय वाढीला खीळ बसली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १२०० हून अधिक पॉलिहाऊ पैकी सद्या जेमतेम ३५० वर नोंदणीकृत पॉलिहाऊस शिल्लक आहेत. अशा स्थितीत या व्यवसायाला नव्याने उभारी देण्याची गरज आहे.
२००० ते २००५ या कालावधीत जिल्हाभरात पॉलिहाउसची संख्या १२०० च्या आसपास होती.
सध्या जिल्ह्यात अपवाद वगळता फुलांची निर्यात थंडावली आहे, तर काही पॉलिहाऊस धारकांनी गुणवत्तापूर्ण फुलांचे उत्पादन घेणे सुरू ठेवले आहे.
हैदराबाद, दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, जयपूर अशा बड्या शहरातील पंचतारांकीत हॉटेल तसेच शाही समारंभाच्या सजावटीसाठी कोल्हापूरातून फुले जातात.
रोज दीड पाच ते सहा टन फुलांची उत्पादन बड्या शहरात तसेच परदेशात निर्यात होत होती. हे प्रमाण सध्या नगन्य झाले आहे.