Team Agrowon
वातावरणीय बदलामुळे रब्बी कांदा हंगाम अडचणीत सापडला होता.
एकरी उत्पादन खर्च पाऊण लाखांवर पोहोचला; मात्र काढणी अवस्थेत बुरशीजन्य रोग व तापमानामुळे एकरी उत्पादन घटले.
‘कांद्याला ना आकार ना प्रतवारी’ अशीच स्थिती होती. त्यातच साठवणुकीदरम्यान टिकवणक्षमता संपुष्टात आल्याने नुकसान वाढले.
गेले पाच महिने उन्हाळ कांदा उत्पादन खर्चाखालीच विकल्याची परिस्थिती होती; मात्र दीड महिन्यापासून ५० टक्क्यांवर सड वाढल्याने आवक कमी होत असल्याने बाजारात कांद्याच्या दराला टेकू मिळाला आहे.
राज्यात प्रमुख उन्हाळ कांदा उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्यात सरासरी दराने २००० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला; मात्र क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा दिसून आली.
चालू वर्षी शेतकरी उत्पादकता व दराच्याबाबतीत कोंडी झाल्याने बेजार झाला आहे. कांदा काढणीपासून ते सप्टेंबरअखेरपर्यंत दरात अपेक्षित सुधारणा झालीच नाही.
आता साठवलेल्या कांद्याची ५० टक्क्यांवर सड होऊन आवक घटल्याने दर सुधारत आहेत; मात्र अखेरच्या टप्प्यात वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काहीही लाभदायक नसल्याची स्थिती आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.