Team Agrowon
रबर हे केरळमधील महत्त्वपूर्ण पीक आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के उत्पादन केरळमध्ये होते.
केरळनंतर देशातील त्रिपूरा आणि तामिळनाडू या राज्यातही मोठ्या प्रमाणात रबराचे उत्पादन घेतले जाते.
लागवडीसाठी पोषक हवामान आणि जमीन असलेल्या दक्षिण गुजरातमध्येही रबर लागवडीस प्राधान्य दिले जाणार आहे.
यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाने विविध संशोधन केंद्रांवर याबाबतचे प्रात्यक्षिक सुरू केले आहे.
नैसर्गिक रबरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, यादृष्टीने रबर उत्पादनही वाढविण्याची आवश्यकता आहे.
याच संधीचा फायदा घेण्यासाठी गुजरातच्या दक्षिण भागात रबर लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
रबर शेतीसाठी दक्षिण गुजरात आणि केरळचे वातावरण सारखेच असल्यामुळे तेथील पिके येथे सहजपणे उगवण्याची शक्यता नाकारता येत नाही.