Team Agrowon
खा.शरद पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा झाला.
यावेळी देशभरातील कोट्यावधी कार्यकर्त्यांचे दैवत असलेल्या पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सहकार क्षेत्राचा वेगाने विकास ही आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठी भविष्यात पवारांनी मार्गदर्शनाची केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच खऱ्या अर्थाने गरज आहे, असे मत अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे पाटील म्हणाले, सक्षम आणि पुरोगामी विचारांनी आजवर त्यांनी केलेले कार्य राष्ट्राला नेहमीच गतिमान करणारे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.
याप्रसंगी खा.ओमराजे निंबाळकर, रोहित पवार, बबनरावजी शिंदे, रवींद्रजी धंगेकर, संदीपजी क्षीरसागर, कैलास पाटील, संजयमामा शिंदे, राजनजी पाटील,
यशवंतजी माने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, चेअरमन बबनरावजी आवताडे, डॉ.बी.पी.रोंगेसर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, उत्तमराव जानकर, महेशजी कोठे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते...