Team Agrowon
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा नुकतीच संपन्न झाली.
या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो कावडी घेवून भाविक गडावर येत असतात. रविवारी (ता. २) या यात्रेचा मुख्य दिवस होता.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिखर शिंगणापूर गावाच्या नावावरूनच या गडाला हे नाव पडले.
शिखर शिंगणापूरची यात्रा ही राज्यासह देशभरात प्रसिध्द आहे. या यात्रेसाठी येणारी प्रत्येक कावड ही मुंगी घाटातूनच गडावर दाखल होते.
मुंगी घाटातून गडावर चढणाऱ्या कावडींचा थरार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
तेल्या भुत्याची कावड ही यात्रेतील मानाची कावड असून कावडीचा मुंगी घाटातील प्रवास हा थराररक आणि अंगावर काटा आणणारा असतो.
कावडीतून आणलेले पाणी मंदिरातील शिवलिंगावर वाहिले जाते. दोन लिंग असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मानले जाते.