Team Agrowon
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सुमारे शंभर रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या सोयाबीनच्या दरात किंचत घट झालेली आहे. परंतु शेतकरी माल रोखून ठेवत टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत.
त्यामुळे बाजारावर आवकेचा दबाव नाही. तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.
गेल्या आठवडाभरात इंदूर मार्केटला सोयाबीनचे दर ५६९८ रूपयांवरून ५५३४ रूपयांवर आले. तर अकोला मार्केटला सोयाबीन ५८५८ वरून ५६१८ रूपयांवर आले.
काही मार्केटमध्ये दर ५४०० रूपयांवरही पोहोचले होते. परंतु या दरपातळीवत आता शंभर रूपयांची वाढ होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.
कारण शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारात आवक वाढत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे.
त्यामुळे त्यांनी वाढीव किंमतीला सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवेल.