Team Agrowon
एरवी होळी झाली की तापमान वाढायला लागते. परंतु यावर्षी होळीच्या आधीच वातावरण तापले.
घामाच्या धारा काढणारा उन्हाळा नकोसा वाटतो ना? पण जरा थांबा. घरातले पंखे बंद करा, ए.सी.च्या हवेतून बाहेर येऊन बघा.
ऋतुराज वसंत आपल्या आगमनाची चाहूल देतोय. त्यामुळे निसर्गाचे रुपडे कसे बदलून गेलेय. निसर्गाच्या रुपात किती बदल होतायत.
होय, निसर्गाचा वार्षिक महोत्सव ‘वसंतोत्सव’ सुरु झालाय. पावसाळ्यात जशी सृष्टी वेगळ्या हिरवाईने भरून जाते, तशी या वसंतोत्सवात रंग-गंध-चैतन्याची लयलूट सुरु होते.
आणि रंगोत्सव साजरा होत असतो तो जंगलात, रानात, वनांत. वसंत ऋतूने किमया केलेली असते आणि अखंड सृष्टी चैतन्याने भारून जाते.
वसंत ऋतु फाल्गुन, चैत्रआणि वैशाख अशा तीन महिन्यांत विभागून येतो.