Team Agrowon
यंदाच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचे आदेश मिळाले आहेत.
यापैकी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ३६ कोटी लिटर्सपेक्षा अधिक इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. एकूण उद्दिष्टाच्या २८ टक्के इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे.
नुकतीच साखर आयुक्तालयात‘दि इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ची बैठक पार पडली. या बैठकीत इथेनॉल निर्मिती उद्योगातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला.
२०२१-२२ मध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉलची विक्रमी निर्मिती केली. गेल्या हंगामात देशात इथेनॉल निर्मितीसाठी ३५ लाख टन साखर वळविण्यात आली होती.
यामध्ये महाराष्ट्रातील साखरेचा वाटा १५ लाख टनांचा होता. कारखान्यांना सध्या साखरेपेक्षाही इथेनॉल निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत आहे.
चालू २०२२-२३ इथेनॉल हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना तेल कंपन्यांना ते सांगतील त्या राज्यात इथेनॉलचा पुरवठा करावा लागतो.
राज्यात इथेनॉल पुरविणे कारखान्यांना परवडते. मात्र, परराज्यात पुरवठा करणे खर्चिक व वेळखाऊ असते.