टीम ॲग्रोवन
मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो.
या कालावधीत दक्षिण भारतात यंदा ८८ ते ११२ टक्के म्हणजे सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यातच या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. उर्वरित देशात मॉन्सून सक्रिय आहे.
मॉन्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तमिळनाडू,पदुच्चेरी, कराईकल,आंध्रप्रदेशचा सीमावर्ती भाग, येमेन, रायलसीमा, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होते.
दीर्घकालीन सरासरीनुसार मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात ३३४.१३ मिलिमीटर पाऊस पडतो.
यंदाच्या हंगामात सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात संपूर्ण देशाचा विचार करता अति उत्तरेकडील
राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता उर्वरित देशात या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
वर्षअखेरपर्यंत ला-निना स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तर भारतीय समुद्रामध्ये सध्या निगेटिव्ह आयओडी स्थिती आहे. ती वर्षाअखेर तटस्थ होण्याची शक्यता आहे.