Team Agrowon
काहीवेळेस दुधाची शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी दुधात रासायनिक घटक मिसळले जातात. हे रासायनिक घटक मानवी आरोग्यासाठी अपायकारक असतात.
दुधातील मलई, म्हणजे साय काढून टाकल्यानंतर त्यातील स्निग्धांशांचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण वाढते.
साय काढून टाकल्यास, पाणी मिसळल्यास फॅटचे प्रमाण अजून कमी होते. या दुधात स्टार्च किंवा साखर मिसळली जाते.
पाणी टाकल्याने दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते. मात्र एस.एन.एफचे प्रमाण तेवढेच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास टोटल सॉलिडचे प्रमाण वाढते. याशिवाय साखर टाकल्यामुळे दुधाला गोड चव येते.
दुधात कशाचीही भेसळ केल्याने सर्वप्रथम दुधातील फॅटवर परिणाम दिसून येतात.