Team Agrowon
मालेगाव जि.वाशिम येथे पिकविमा,अतिवृष्टीची रखडलेली मदत व सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चाला रविकांत तुपकर यांनी उपस्थित संबोधित केले.
रखरखत्या उन्हातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते!
पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे.तसेच अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
तर सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाही
त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आता आर-पारच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. जर १० फेब्रुवारी पर्यंत सरकारने आमच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर ११ फेब्रुवारी रोजी आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
त्यानंतर एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्हाला गोळ्या घालाव्या. अशी आक्रमक भूमिक रविकांत तुपकर यांनी घेतली.