Team Agrowon
काकडा, अमरावती ः संततधार पावसामुळे खरिप हंगाम लांबणीवर पडला आहे.
परिणामी कापूस फुटण्यासोबतच तूरीला फुलोरही उशीरा लागला.
सद्यस्थितीत अनेक ठिकाणी तूर फुलोऱ्यावर असून शेत बहरली आहेत.
एकूण फुलधारणेच्या सरासरी 70 टक्के शेंगधारणा होते असे कृषी विद्यापीठ तज्ज्ञ सांगतात.
परिणामी यंदा तूरीची उत्पादकता चांगली राहील, अशी शक्यता आहे.