Team Agrowon
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला
या रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकार आग्रही आहे. मात्र, शिवसेनेच्या ठाकरे गट स्थानिकांच्या आंदोलनात सहभागी असूनही विरोध केला होता.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी बारसू परिसरातील गावांमध्ये जाऊन आंदोलकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या वज्रमुठ सभेत बोलताना शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर जाऊन बारसू रिफायनरीच्या आंदोलकांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेही बारसूतील लोकांची भेट घेणार आहेत
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनीच नाणारऐवजी बारसूचा पर्याय केंद्राला सुचवला होता, असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे.
उद्धव ठाकरे आंदोलकांची शनिवारी भेट घेणार आहेत. त्याच दिवशी आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यावतीने बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात येणार आहे. .