Team Agrowon
तापमानातील चढ-उतारामुळे आंबा मोहराची गळ होते.परागीकऱणावर परिणाम होतो त्यामुळे फळांच उत्पादन कमी मिळत.
आंब्याचा मोहोर सूक्ष्म अवस्थेत ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये तयार होतो. मोहोर बाहेर येण्यासाठी कमी तापमानाची म्हणजेच १५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
तापमान १२.५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर अंब्याला नवीन पालवी येत नाही व मोहराच प्रमाण वाढत.
तापमान कमी असल्यास कीटकांची परागीकरण करण्याची क्षमता कमी राहते व परागीकरण कमी झाल्यान फलधारणा कमी होते.
सुरुवातीला लवकर आलेल्या मोहोराच फारच कमी म्हणजे १० टक्के परागीकरण होत. तर त्यानंतर आलेल्या फुलांच परागीकरण यापेक्षा जास्त व उशीरा आलेल्या फुलांच परागीकरण ४० ते ६० टक्के पर्यंत होत.
मोहर बाहेर आल्यापासून बरेच दिवस तापमान कमी असेल तर नर फुलांच प्रमाण वाढत. संयुक्त फुलांच प्रमाण १३ टक्क्यांवरुन ३ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरत. यामुळेच उशिरा आलेल्या मोहोरामध्ये तापमान वाढल्यान संयुक्त फुलांच प्रमाण जास्त आढळत.