Team Agrowon
अलिबाग शहरालगत असलेलं कार्ले नावाचं छोटं गाव पांढऱ्या कांद्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
अलिबागच्या कांद्याचं जगात एकमेवाद्वितीय असलेलं वैशिष्ट्य म्हणजे हा कांदा कधीच सुटा विकला न जाता माळेच्या रूपातच विकला जातो.
सुमारे ९० दिवसांत कांदा पक्व होतो. त्याचे आंतरपीक घेतले जात नाही. काढणीनंतर थेट पुढील खरीप हंगामातच भात घेतला जातो.
अलिबाग भागातील जमिनींमध्ये गंधकाची कमतरता आहे. त्यामुळेच या मातीतील कांदा गोड लागतो.
तिखटपणाशी संबंधित आणखी एक घटक म्हणजे पायरुविक ॲसिड. अलिबागच्या विशेषतः ओल्या कांद्यात त्याचेही प्रमाण कमी असते. साठवणुकीत त्याचे प्रमाण थोडे वाढते.
अलीकडील काळात या कांद्याला मागणी वाढल्याने क्षेत्रही वाढलं आहे.