Team Agrowon
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील सुहास कुंभार यांच्या शेतातील गहू चांगलाच तरारला आहे.
यंदा देशात परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. रब्बीचा पेराही जोमात सुरु आहेत.
मात्र परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे खरिप हंगामा वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांची भीस्त रब्बीतील पिकांवर आहे.
गेल्या हंगामातील गव्हाला चांगाल दर मिळाला. त्यामुळे देशात चालू रब्बी हंगामात गव्हाची लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाढत्या थंडीचा गहू पिकावर अनुकूल परिणाम होत आहे. त्यामुळे गहू पीक जोमात आले आहे.
सुहास कुंभार कुंभार यांनी दीड एकर अंकुर केदार या वाणाच्या गव्हाची पेरणी केली आहे. गव्हाची वाढ चांगली होत असून त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.