Team Agrowon
जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील द्राक्षाच्या आगारातील द्राक्षाच्या दरात वाढ नसल्याचीच स्थिती आहे.
ग्राहकांना लागणारे दर व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळणारे दर यात मोठी तफावत दिसत आहे. शिवाय वातावरणाची प्रतिकूलता शेतकऱ्यांना आपले द्राक्ष मिळतील त्या भावात विक्री करावी लावत असल्याचे चित्र आहे.
आधी थंडीमुळे द्राक्षाला उठाव नव्हता. महाशिवरात्री आधी ३५ ते ४० रुपयांपर्यंत असणारे द्राक्षाचे प्रती किलोचे दर घडीला २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले होते.
आता ते १५ रुपयांपासून ३० रुपयांच्या आतच प्रति किलोपर्यंत खाली उतरले असल्याचे शेतकरी सांगतात.
जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.