Team Agrowon
भारतीय आले पीक आपल्या श्रेष्ठ गुणधर्माकरिता ओळखले जाते. अन्न, औषध, मसाला आणि विविध प्रक्रियेत आल्याचा वापर होतो.
जगात उत्पादनात भारत देश दुसऱ्या स्थानावर असूनही केवळ प्रक्रिया उद्योगाला चालना आणि संशोधनाची वाणवा असल्याने आले उत्पादन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही.
जगात चीन आले पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतो, भारताचा दुसरा क्रमांक असून, देशांतर्गत उत्पादनात आसाम सर्वाधिक, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे.
ओल्या कंदास आले व वाळल्यानंतर आल्यावर प्रक्रिया करून सुंठ तयार होते. विविध भाज्यांमध्ये चवीसाठी वापरले जाणारे आले अप्रत्यक्षपणे आरोग्यासाठी हितकारक असते.
सुंठ पावडर देखील उत्तम आरोग्यदायी असते. आयुर्वेदीक औषध निर्मिती तसच विविध मसाल्यांमध्ये सुंठ पावडर ला चांगली मागणी आहे.
Jinger Processingमहिला बचत गटामार्फत किंवा घरगुती व्यवसाय म्हणून आल्यापासून सुंठनिर्मिती व्यवसाय हा चांगला पर्याय आहे.