Fruit Market : फळांना बाजारात का मिळतोय चांगला उठाव?

Team Agrowon

आंब्याला मोठी मागणी

वाढता उन्हाचा तडाखा आणि सोबत रमजान महिना सुरू असल्याने सध्या बाजारात फळांना विशेष मागणी आहे. त्यातही कलिंगड, पपई आणि टरबूज या फळांबरोबर आंब्याला मोठी मागणी आहे.

Fruit Market | Agrowon

मुंबईच्या घाऊक बाजारात दररोज ५० फळ गाड्यांची आवक होत असल्याने बाजारालाही उठाव आल्याचे चित्र आहे.

Fruit Market | Agrowon

उन्हाळ्यात जागोजागी फळांचे रस, फळांचे सॅलड यांच्या गाड्या लागलेल्या दिसतात. घरी खाण्यासाठीही लोक फळांची खरेदी आवर्जून करतात.

Fruit Market | Agrowon

सध्या बाजारात फळांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीही फळांच्या किमती मात्र स्थिर आहेत. बाजारात फळांना चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Fruit Market | Agrowon

फळे नाशवंत असल्याने उन्हाळ्यात ती लवकर खराब होतात. त्यामुळे ती जास्त वेळ साठवून ठेवता येत नाहीत.

Fruit Market | Agrowon

रमजान महिन्यातील रोजे सोडण्यासाठी बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. त्यामुळे या रसदार फळांना मोठी मागणी आहे.

Fruit Market | Agrowon

म्हणूनच कलिंगड, पपई, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Fruit Market | Agrowon

तापमान वाढल्‍याने फळांच्या रस पिण्यालाही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. त्‍यामुळे लिंबू पाणी, उसाच्या रसाला, कलिंगड-मोसंबीच्या रसाची मागणी वाढली आहे.

Fruit Market | Agrowon
Jowar | Agrowon