Team Agrowon
भारताने दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले.
एकीकडे राज्य सरकारे शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. तर दुसरीकडे ते लोकांच्या ताटात आणण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे.
भरडधान्याच्या जागृतीविषयी जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतात अनेक प्रकारची तयारी सुरू आहे.
बऱ्याच लोकांच्या आहारात अजूनही केवळ गहू आणि तांदळाचा वापर केला जातो.
लोकांच्या ताटात ८ प्रकारची पौष्टिक भरडधान्य पोहोचवणं हे एक आव्हानात्मक काम आहे.
यासाठी भरडधान्यावर प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे.