
Animal Husbandry News अकोला ः विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रिय शेती (Organic Farming) व पंचगव्य औषधीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश सवंर्धन (Bovine Conservation) करणे ही काळाजी गरज बनली आहे, असा सूर येथे आयोजित चर्चासत्रात वैज्ञानिकांनी व्यक्त केला.
आत्मा व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या सभागृहात हे चर्चासत्र झाले.
या वेळी राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनील मानसिंहका, आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाचे विवेक बिडवाई, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. जी. दिघे, प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत कपले, आत्मा प्रकल्प संचालक आरीफ शाह आदी उपस्थित होते.
‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांचे महत्त्व याबाबत वैज्ञानिकांनी मार्गदर्शन केले.
सुनील मानसिंहका म्हणाले, ‘‘रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली, तर त्यांचा परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे.
गायीपासून उत्पादित होणाऱ्या पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच शिवाय निरोगी राहण्यास मदत होईल.
’’ डॉ. पोहरकर यांनी गो-आधारित संशोधनावर भर देण्याची आवश्यक असून, पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे.
पंचगव्य औषधीवर केलेले संशोधन नागरिकांपर्यंत पोहोचवा. आयुर्वेदिक शास्त्रात पंचगव्य औषधीचे महत्त्व सांगितले आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत कपले यांनी केले. सूत्रसंचालन मनीष इंगोले यांनी, तर आभार डॉ. दिलीप बदुकले यांनी मानले.
पंचगव्य म्हणजे काय?
गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.