
जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ तासांच्या आत बाहेर पडायला पाहिजे. प्रसूतीच्या तिसऱ्या टप्प्यात वार पडत असते. खरं तर वार पडल्यानंतरच गर्भाशय पूर्वस्थितीत येत असते. गर्भाशय सुटणे, गर्भाशयास कळा येण या सर्व गोष्टी वार पडण्यासाठी आवश्यक असतात. वासराचा जन्म झाल्यानंतर वारेचे कार्य संपत असते. कारण वार हा गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव असतो. वासरू बाहेर आल्यानंतर शरीराकडून वारेस होणारा रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे आपसूकच वारेच्या पेशी निर्जीव होतात, त्यातील पाण्याचा अंश कमी झाल्यानं वार अंकुचन पावते. वारेचा गर्भाशयाशी संपर्क तुटून ती लांबते व वासराच्या वजनामुळे आणि गर्भाशयाच्या कळामुळे शेवटी वार बाहेर पडत असते. हेही पहा- व्यावसायिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून करा प्रजनन व्यवस्थापन
वार न पडण्याची प्रमुख कारणे-
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.