
कोणताही आजार होण्याआधी त्या जनावरांचे लसीकरण करणे खुप महत्त्वाचं असतं. आजाराची बाधा झाल्यानंतर लसीकरण केल्यास फारसा फायदा होत नाही. जनावरांना वयानुसार आणि वजनानुसार लसीकरण करण गरजेचं आहे. एकाच वेळी गोठ्यातील सर्व जनावरांना लसीकरण केल्यास जास्त फायदा दिसून येतो.
लसीकरण करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे. लसीकरण (Vaccination) करताना वापरली जाणारी लस योग्य मात्रेत आणि तिची साठवणूक आणि वाहतूक योग्य पुरवठा साखळीतून झालेली असावी. लस नेहमी निरोगी शेळ्यांनाच टोचावी. लस टोचलेल्या ठिकाणी व्यवस्थित चोळावे म्हणजे त्या ठिकाणी गाठ येणार नाही. लसीकरण करण्याअगोदर ८-१० दिवस अगोदर शेळ्यांना जंतनाशक (Deworming) पाजावे; जेणेकरून लसीचा परिणाम चांगला होण्यास मदत होते.
हेही पाहा- महाराष्ट्रातील शेळ्यांच्या चार जाती
वेळच्या वेळी लसीकरण न केल्यास रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास गोठ्यातील फक्त एक शेळी, करडू अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. म्हणून वेळच्या वेळी लसीकरण करत जा. मात्र लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.