हंगाम संपत आला तरी राज्यातील ऊस (Sugarcane) शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर (sugar industry) या अतिरिक्त उसाच्या गाळपाचा पेच निर्माण झाला आहे. काही कारखाने वाढीव उसाचे गाळप करण्याची क्षमता नसल्याचे सांगत आहेत तर उसाच्या शेवटच्या टिपरापर्यंत गाळप करण्याचे आदेश साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.
हे ही वाचा - कसे आहे केंद्राचे गव्हाच्या हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट ?
गेल्या साखर हंगामात २५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील केवळ १७८ कारखाने सुरु होते. एकूण हंगामात गेल्यावर्षी या कारखान्यांनी ८०.४७१ दशलक्ष टन उसाचे गाळप करून ८.२३७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते.
हे ही वाचा - देशात कापूस लागवड क्षेत्र १५ टक्के विस्तारेल
गेल्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत ८.२३७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात कारखान्यांनी ९३८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा आकडा पार केलेला आहे. हंगाम संपत आल्यावरही गाळपासाठी ऊस शिल्लक असल्यामुळे कारखान्यांनी त्यांची दैनंदिन गाळपाचे क्षमता वाढवली आहे. विशिष्ट कालावधीनंतर गाळप करणे शक्य नसल्याचेही अनेक कारखान्यांच्या संचालकांनी म्हटले आहे.
व्हिडीओ पाहा -
साखर कारखाने अशा प्रकारे शेतकऱ्यांचा ऊस वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात इतर कारखान्यांनी येऊ नये, यासाठी आग्रही असलेले कारखाने अतिरिक्त उत्पादनाच्यावेळी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप कसे काय नाकारू शकतात?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. गाळपासाठी ऊस मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ऊस लागवड करायला लावणारे कारखाने कुठल्याही जास्तीचा ऊस नाकारू शकत नसल्याचेही शेट्टी यांनी नमूद केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.