ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः दोन लाखांवरील कर्जदारांना कर्जमाफी मिळावी या मागणी जिल्ह्यातील आंबा (Mango) , काजू (Cashew) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी दिले आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ दोन लाखांवरील कर्जदारांना मिळालेला नाही. या निर्णयाचा मोठा फटका जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार कर्जदारांना बसला आहे. त्यामुळे या कर्जदारांना कर्जमाफी मिळावी, खावटी कर्जदारांचे कर्ज माफ करावे. यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील बागायतदारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. बागायतदार महादेव परब, श्यामसुंदर राय, सुरेश गावकर, अर्जुन नाईक, प्रभाकर सावंत, सुभाष भगत, अशोक सावंत आदी उपोषणास बसले होते. कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात कोविड काळात घेतलेली अल्प आणि मध्यम मुदतीची कर्जे शेतकऱ्यांना भरता आलेली नाही ती देखील माफ करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.