खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामे रखडणार नाहीत याची काळजी घ्या : कृषिमंत्री दादा भुसे

शेतीविषयक कामे रखडू नयेत यासाठी राज्यात सुरू असलेल्या लॉकडाउनमधून शेतीविषयक साहित्यांच्या दुकानांना वगळण्यात आले आहे.खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ सुरु राहतील. तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत या दुकानांच्या वेळा बदलण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. - दादा भुसे, कृषिमंत्री
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई  : राज्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत असताना पेरणीपूर्व कामे, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशी निगडीत कामे लॉकडाउनच्या परिस्थितीत रखडणार नाहीत याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

याबाबत श्री. भुसे म्हणाले, की  खरीप हंगामासाठी कृषी विभागातील अधिकारी अणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता कोरोना प्रतिबंधाच्या कामासाठी या विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेऊ नये.

शेतमजुरांना कामासाठी ये-जा करणे सहजसुलभ व्हावे तसेच शेतीविषयक व्यवसायातील व्यक्ती आणि संबंधित विभागातील अधिकारीआणि कर्मचारी यांच्यासाठी कृषी विभागाने दिलेली प्रवेशपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com