शासन करणार ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक  : कृषिमंत्री दादा भुसे 

नगर : राज्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्धआहेत. ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक सरकार करत असून शेतकऱ्यांनी यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात दर्जेदार शेतीमालाची निर्मिती करावी असे आवाहन कृषि मंत्री दादा भुसे यांनी केले.
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

 नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ५० हजार टन युरियाचा बफर स्टॉक सरकार करत असून शेतकऱ्यांनी यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांनी कमी उत्पादन खर्चात दर्जेदार शेतीमालाची निर्मिती करावी असे आवाहन कृषि मंत्री दादा भुसे यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन खरीप पीक परिसंवादाचा समारोप श्री. भुसे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, प्रा. माधव देसाई, सचिन सदाफळ यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुसे म्हणाले, की गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बांधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेवू. पाट पाणी वाटपाच्या संदर्भात सर्व पाणी वापर संस्थांना सर्व शेतकऱ्यांना समन्यायी वाटप करण्यासंबंधी सांगण्यात येईल. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देवू, जेणेकरुन गावातील सर्व शेतकऱ्यांना त्या ट्रॅक्टरचा उपयोग होईल. लहान अवजारे कुटुबांना पुरवता आली तर त्यांची गुजराण त्याच्यावर होऊन त्यांना फायदा होईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेवू. येत्या १० दिवसात उर्जा विभागाचे नवीन धोरण येत आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेवू.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यावर्षी शेतकऱ्यांसाठी १९०० क्विंटल बियाणे, २४ लाख फळपिकांची रोपे, २५० क्विंटल जैविक खते, ४५० क्विंटल जैविक किटकनाशके विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विक्री केंद्रांवर उपलब्ध केलेली आहेत, असे कुलगुरू डाॅ. विश्वनाथा यांनी सांगितले.

विवेक माने व प्रमोद पाटील या शेतकऱ्यांसह डॉ. सुनिल कराड, डॉ. एच.टी. पाटील, डॉ. बी.एस. रासकर, डॉ. सतिश जाधव, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मधुकर भालेकर या शास्त्रज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी तर आभार डॉ. शरद गडाख यांनी मानले. या दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून ५०० पेक्षा जास्त शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com